Thursday, April 19, 2007

नितळ

'नितळ' हे नाव आहे नवीन पिक्चर'चं.. आत्ताच स्टोरी वाचली त्याची.. माझ्या आयुष्याशी अगदि जुळणारी आहे त्या नायिकेची कहाणी..आणि योगायोगाने आज लोडशेडींग ही नाहीय.. आणि शिवाय कामही नाही आलय अजून.. थोडक्यात सांगायचं तर.. आत्ता जे वाटतंय ते लिहायला आवडही आहे अणि सवडही..
त्या पिक्चर मध्ये एक कोड अलेल्या मुलीची गोष्ट आहे.. ती डॉक्टर आहे.. सुंदर आहे.. गुणी मनमिळावू.. पण एक 'कोड आहे' हे वाक्य तिच्या सगळ्या गुणांची माती करुन टाकतो.. आणि अगदी असच होतय माझ्याबाबतीत.. मला कोड नाही पण मी अपंग आहे.. एका पायाने.. अर्थात मी चालू शकते.. फिरु शकते.. कुणाचीही मदत न घेता रोजची कामं करणं मला सहज शक्य आहे.. पण गेले ४-५ वर्ष भरपूर अनुभवतेय.. त्या नायिकेसारखचं.. म्हणजे माझ्या लग्ना संदर्भात.. मि ग्रॅज्युएट आहे.. हुशार आहे.. दिसायलाही चार चौघीं पेक्षा सुंदर आहे.. कमावते बऱ्यापैकी.. प्लॅस आई वडील वेल-स्टेटस असलेले आहेत.. पण या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत.. कारण माझा पाय असा आहे..
एक माणूस आहे (आता माणूसच म्हणावं लागतंय.. कारण मुलगा/ तरुण नाही म्हणता येणार.. आणि पुरुष म्हणणं अगदीच ऑड वाटतं.. तर तो माणूस आहे माझ्यासारखाच. हॅन्डिकॅप.. एका पायाने.. तोही शिकलेला.. वेल सेट्ल आहे.. माझ्यासाठी परफेक्ट मॅच.. पण त्याला मी नकोय.. कारण एकच त्याला हॅन्डिकॅप नसलेली मुलगी हवीय.. एकीकडे हि तऱ्हा तर दुसरी कडे अजूनच दुसरी.. साधारण २-३ वर्षापूर्वी एक माणूस मला येऊन भेटलेला.. तो विवाहीत होता.. तरी त्याला माझ्याशी दुसर लग्न करायच होतं.. माझा उध्दार करयचा होता.. साहजिकच मी नाही म्हटलं.. वडीलांशीही कॉन्टक्ट केलेलं त्याने.. जाऊ दे झालं.. अजून एक गेल्या वर्षी संपर्कात आला होता.. हातीपायी धड.. पण शिकलेला होता.. जॉब होता साधासा.. पण त्याच्यापुर्ती ठीक होता.. त्यालाही एक महान सामाजिक कर्य करायच होत.. माझ्याशी लग्न करुन.. त्याला माझ्याशी लग्नाच्या बदल्यात घर हव होत.. तेही मान्य केल.. पण घर मोठंच हव.. मी त्यासाठी लोन काढायचं नाही.. अश्या एक ना अनेक कंडीशन्स होत्या.. झालं एक दिवस मन उडालं.. तस अजूनही बोलतो आम्ही.. पण तेच सगळं.. मग मला वाटतं तोपर्यंत बोलते.. नाहीच तर फोन करायचा बंद करते.. सिंपल..
तर हे अस सगळं.. सगळ्यानिंच बाजार मांडलेला.. हे असंच चालायचं.. चालू दे.. काय फरक पडतो.. प्रत्येक गोष्टीत दोनच ऑप्शन असतात.. + व्हिव ओर - व्हिव.. तेंव्हा मी याचा जास्त विचार करत नाही.. एकतर माझ लग्न होईल.. किंवा मीच या सगळ्या वृत्तींना.. माणसांना.. वैतागून जाईन.. लग्न न करणं सुखाच वाटेल मग मला.. बघूया आता काय होतंय ते..

Thursday, March 8, 2007

Sheevsaineek

खूप शोधल.. पण सापडतच नाहिय.. मराठीमध्ये ब्लॉग कसा लिहायचा ते.. आणि विचाराव तरी कुणाला???.. असू दे, ते समजत नाहि.. तो पर्यंत असाच लिहू या.. बरोबर ना.. आज XXX चि आठवण येतेय.. गेला आठवडाभर फोन नाही केलाय.. पण त्याचही काही समजत नाही.. म्हणजे फोन केला तर अगदी छान बोलतो.. म्हणजे एखाद्या मित्रा सारखा.. खर तर मित्रापेक्षा जास्तच अहे तो.. हे त्यालही माहीतेय नी मलाही.. लग्न जुळवण्या-या एका साईटवरुन आमची ओळख झाली आहे..खूप आश्वासनात्मक बोललेला तो माझ्याशी..कधी कधी अगदी विक्षिप्त वाटतो.. आणि कधी कधी खूप खोटरडा.. पण तरीही मी फिरुन फिरुन त्याच्याकडे जाते.. मला वाटतं आम्ही एकमेकांना चांगल समजून घेऊ..तसं अगदी हाच नवरा हवा असं काही नाहीय माझं..मला दुसरा ऑप्शन मिळाला की मी नक्की विसरु शकेन त्याला.. किंवा असं म्हणता येइल की त्याची आठवण त्रासदायक नसेल.. विसरायच तरी कस त्याला.. कारण इतकी वर्ष माझ्या जोडीदाराला चेहरा नव्हता.. तो त्याने दिलाय..जेंव्हा जेंव्हा लग्नची गोष्ट निघते तो आठवतो.. मी कधी कधी त्याला फोन करते... मध्ये जवळ जवळ ४ महीने गेलेले असतात... खरच त्याच्यात काहीच बदल झालेला नसतो.. अणि कदाचित हेच आवडतं मला.. काय हवय त्याला.. का तो माघार घेत राहतो.. खूप विचारावसं वाटत.. पन शब्द फुटत नाहीत.. वाटत कदाचित खर बोलेल तर सहन नाहि होणार.. पन असही नाही.. बोलायलाच जमत नाहि हेच खर.. त्याच स्वभाव अगदी चकली सारखा आहे.. वेटोळे वेटोळे घेत बोलतो तो.. मग राग येतो..
वाटतं तो नुसता टाइमपास करतोय..कारण तो ज्या गोष्टीसाठी माझ्याकडे आलेला ती सोडून तो जगभराच्या गोष्टी बोलतो.. म्हणजे लग्न नको असं म्हणत नाही.. पण केव्हा करायचं ते बोलत नाही..भेटायलाही बोलावतो.. तसं त्याच्या मित्राशीही बोललेय मी.. पण तरीही वाटतं.. कदाचित हा आपला फायदा घेत असावा..पण ठोस निर्णय घ्यायची अजून वेळ नाही आलीय.. म्हणून गप्प बसते..बघू आता काय होतं ते...

Tuesday, January 16, 2007

माझं लिखाण

खरं तर खूप दिवसापासून वाटतय काहीतरी लिहावं म्हणून.. कोलेज सोडल्यापासून काहि लिहिणं अस झालच नाहि.. आणि आता तर फक्त सही करण्यापुरत पेन हाती घेते.. पण तरीही हल्ली वाटत मनात कितीतरी विचार येतात.. सगळेच नाहि ना आपण कुणाला सांगू शकत.. हे छान आहे.. हल्लीच वाचलय कुठेतरी.. आपल्याला जे काहि बोलावस वाटतं.. मान.. स्पेशिअली अपमान जे अपण इतरांना नही सांगू शकत ते एका कागदावर लिहायचे.. आणि मग.. मग तो कागद फाडून टाकायचा.. मन मोकळ करणं खरचं अस सोपं असत का??